”या” दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

Namo Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनासोबतच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात केंद्र शासनाकडून पी एम किसान योजना तर नमो शेतकरी महासन्माननिधी योजना नुकतीच राज्य शासनाकडून राबविण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी ही सुरू झालेली असून शासन निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे. राज्यात राबवले जाणाऱ्या सीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या 14वा हफ्त्यासोबतच म्हणजेच १५ जुलै रोजी दिला जाणार असणार अशी माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले या हप्त्याची शेतकरी हे वाट बघत होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांची ही वाट लवकरच पूर्ण होणार आहे.

 

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेबरोबरच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्माननिधी योजना लागू केली आहे. यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये, त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान लाभ म्हणून दिले जाणार आहेत. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत २,००० त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत २,००० रुपये असे मिळून 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

 

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. हे पैसे चार महिन्यांच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यात 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात. पण आता राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत.शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेले. याचाच अर्थ प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खरंतर खूप दिलासादायक निर्णय आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं कसा अर्ज करावा लागेल? याबाबतची अधिकृत माहिती सध्यातरी राज्य सरकारडून सविस्तरपणे जारी करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक-दोन वाक्यात माहिती दिली आहे.

Leave a Comment